'त्या' नराधमाला कृत्याचा पश्चात्ताप नाहीच ?

    04-Feb-2020
Total Views | 325

hinganghat accused_1 
 
वर्धा : वर्धामधील हिंगणघाट येथे सोमवारी एका तरुणीला भर रस्त्यामध्ये जिवंत जाळण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्रभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभर आंदोलने आणि हिंगणघाटमध्ये बंद पाळण्यात आला आहे. तरुणीला जाळणारा नराधम विकेश उर्फ विकी नगराळे याला पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले होते. सध्या त्याला गुप्तपणे न्यायालयामध्ये झांजर करण्यात आले आहे. परंतु, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या नराधमाला त्याला केलेल्या कृत्याचा पच्छाताप नसल्याचे वक्तव्य केल्याचे समोर येत आहे. तसेच हे कृत एकतर्फी प्रेमातून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
 
विशेष म्हणजे आरोपी हा विवाहित असून त्याला एक लहान मुलगी आहे. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच गावात राहत होते. विक्की आणि पीडित तरुणी अनेकदा शिक्षणासाठी एकाच बसमधून प्रवास करायचे. मात्र, पीडित तरुणी आरोपीशी बोलणे टाळत होती. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपीने याआधीही पीडित तरुणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्याने तिच्या घरच्यांसमोर मी विष पिऊन अंतःत्या कारेन अशी धमकी दिली होती, पण यावेळी तिच्या घरच्यांनी त्याची समजूत काढून प्रकरण टाळले होते, अशी माहिती तरुणीच्या घरच्यांनी दिली.
 
 
पीडित तरुणी शिकवणीसाठी महाविद्यालयात जात असताना त्याने डाव साधत तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले आणि तेथून पळ काढला. या घटनेची माहिती काळातच पोलिसांनी तेथे पाचारण केले. त्यानंतर फरारी असलेल्या विकी नगराळेला काही तासांमध्येच बेड्या ठोकल्या. सध्या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपीच्या कृत्याचा राज्यभरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. आरोपीला भर चौकात फाशी द्या, जसे तिने त्या तरुणीवर हल्ला केला तसाच त्याच्यावरही करा, त्याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या हिंगणघाट ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थिनींकडून केला जात आहे. महाराष्ट्रभर या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121