मुसलमानांच्या मनात भीती कालवून भारत विखंडन शक्तींनी एका पोलिसाच्या कुटुंबाला पोरके केले, तसेच आणखी नऊ जणांचा बळी घेत त्या त्या परिवारांचाही आधार हिसकावला, तर शेकडोंच्या संख्येत लोकांना जखमी केले. भिवंडीतील पोलीस चौकी जाळत पोलिसांना ठेचणारी आणि मुंबईतील अमर जवान ज्योतीवर लाथा घालणारी मानसिकता एकच हेही इथे समजून घेतले पाहिजे.
आमच्या आंदोलनासमोर अन्य कुणी मोर्चा काढण्याची हिंमत कशी करतोचा राग येऊन 'सीएए', 'एनआरसी' व 'एनपीआर' विरोधकांनी मात्र आपले खायचे दात दाखवले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आल्याची संधी साधून देशविघातक आणि समाजशांतीद्वेष्ट्या झुंडींनी दिल्लीच्या रस्त्यारस्त्यांत, चौकाचौकांत, मेट्रो स्थानकांनजीक नंगानाच चालू केला. शाहीनबागेत बायका व लहान मुलांना पुढे करून साळसूदपणाचा आव आणणार्यांनी पद्धतशीरपणे हिंदू वस्तींवर, दुकानांवर, वाहनांवर दगडफेकीला, जाळपोळीला, मारहाणीला, तोडफोडीला सुरुवात केली. संविधान आणि तिरंग्याच्या आड लपून आंदोलन करणार्या कट्टरवाद्यांनी 'नारा-ए-तकबीर' आणि 'अल्ला-हूँ-अकबर'च्या घोषणा देत दिल्ली जाळण्यासाठी कंबर कसली.
शाहीनबागेतील चिमुकल्याच्या मृत्यूला 'कुर्बानी'चे नाव देत त्याचे भांडवल करणार्यांनी खुनशी खेळ चालू केला आणि दिल्लीतील मौजपूर, चांदबाग, बाबरपूर, जाफराबाद, करावल नगर, भजनपुरा, गोकलपुरीसह कितीतरी ठिकाणे धुमसू लागली. दंगलखोरांना आवरण्यासाठी आलेल्या पोलिसांना आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जाणार्या अग्निशमन दलाच्या बंबावरही या लोकांनी हल्ले केले. विशेष म्हणजे, आतापर्यंत दगडफेक, जाळपोळ करणार्या आंदोलकांनी पिस्तुलातून गोळीबारालाही सुरुवात केली. मोदी-शाह यांना पाण्यात पाहणार्यांनी खोट्यानाट्या बातम्या पेरून केलेला अपप्रचार अशाप्रकारे दिल्लीच्या रस्त्यावर रक्तरंजित धुडगूस घालू लागला आणि त्यातच हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांचा जीव गेला. मोहम्मद शाहरुख नावाच्या दंगलखोराने पिस्तुलातून गोळ्या झाडत रतनलाल यांचा खून केला आणि त्यांनी आपल्या मुलांना दिलेले होळीला गावी जाण्याचे वचन अधुरेच राहिले. मुसलमानांच्या मनात भीती कालवून भारत विखंडन शक्तींनी एका पोलिसाच्या कुटुंबाला पोरके केले, तसेच आणखी बारा जणांचा बळी घेत त्या त्या परिवारांचाही आधार हिसकावला, तर शेकडोंच्या संख्येत लोकांना जखमी केले. इतकेच नव्हे तर मंगळवारी सायंकाळी हिंसेचे थैमान घालणार्यांनी निमलष्करी दलाच्या जवानांवर अॅसिड फेकण्याचे निर्घृण कृत्यही केले. भिवंडीतील पोलीस चौकी जाळत पोलिसांना ठेचणारी आणि मुंबईतील अमर जवान ज्योतीवर लाथा घालणारी मानसिकता एकच हेही इथे समजून घेतले पाहिजे.
मोहम्मद शाहरुखच्या गोळीबाराचे कांड होऊन त्या एका पोलिसाची हत्या होऊनही मुख्य प्रवाहातील माध्यमांनी मात्र ही बातमी दाबण्याचे, नाव समोर येऊ न देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. परंतु, मागच्याच महिन्यात एका हिंदू नाव असलेल्या युवकाने गोळीबार केला तर तमाम माध्यमे, कथित पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी मंडळी हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, भाजप-संघाचा फॅसिझम, नाझीवादाच्या आरोळ्या ठोकत चेकाळल्याचे आपण सर्वांनीच पाहिले. इतरवेळी 'दहशतवादाला धर्म नसतो'चा रट्टा मारणार्यांनी त्यावेळी हिंदूंंना दहशतवादी ठरवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.
पण, मग मोहम्मद शाहरुखने तेच कृत्य केले, तर या दहशतवादाचे नाव घ्यायला का त्यांची जीभ कचरली? तथापि, त्यांनी नाव घेतले नाही तरी आताच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छद्म पुरोगामी आणि छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांची बनवेगिरी फार काळ चालू शकत नाहीच. जसे दंगलखोरांचे बुरखे फाटतील तसेच या कथित बुद्धीजीवी, विचारवंत आणि निष्पक्ष माध्यमांचे मुखवटेही गळून पडतीलच. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प देशात होते म्हणून आंदोलकांवर कठोर कारवाई केलेली नसेल तर पोलिसांनी व लष्कराने नंतर तरी या दंगलखोरांना आवर घालण्यासाठी पावले उचलावी. तरच दिल्लीतील हिंसाचार काबूत येऊ शकेल, रतन लाल यांचे बलिदान सार्थकी लागेल; अन्यथा डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी वगैरे मंडळींनी लावलेली ही आग वाढतच राहील.