कल्याण : कल्याणमध्ये एका कौटुंबिक वादातून एक महिला आपल्या तीन मुलांसह १८ दिवसापासून घराबाहेर राहत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची दखल घेत भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना त्या महिलेच्या मदतीसाठी पाठविले आहे. हे प्रकरण पोलीस मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे.
कल्याण पूव्रेतील शास्त्रीनगर परसिरात राहणाऱ्या तक्रारदार महिला आपल्या दोन मुली आणि मुलासह १८ दिवसांपासून घराबाहेर राहत आहेत. त्यांचा बाड बिस्तारा त्यांनी दारात मांडला आहे. तिचा पती दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहे. अनेक दिवसापासून तिला व तिच्या मुलांना त्याने घराबाहेर काढले आहे. तिच्या पतीसोबत राहायचे आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला सासऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांची सून ही पतीसोबत सासू आणि सासरे यांना जाणीवपूर्वक त्रास देत.असल्याचे म्हटले आहे.तिचा पतीही पोलीसांसमोर आलेला नाही. भाजपा कल्याण शहर महिलाध्यक्ष रेखा चौधरी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या पोलीस, महिला आणि सासरे यादव यांच्यामधील चर्चे नंतर महिला सासरच्या मंडळीसोबत राहणार असल्याचे ठरले आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांनी दिली आहे.