भोपर-देसले गावात नियोजन केल्याने पाणी समस्या सुटण्यास मदत : रविंद्र चव्हाण

13 Dec 2020 17:46:52


kalayan_1  H x



भोपर-देसले गावात नियोजन केल्याने पाणी समस्या सुटण्यास मदत - रविंद्र चव्हाण



डोंबिवली :
भोपर-देसले गावात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे. पण ही समस्या सोडविण्यासाठी नियोजनाची गरज आहे हे ओळखले. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बारावी धरणाची उंची वाढविण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्यामुळे ही पाण्याची समस्या सुटली आहे,असे मत भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. 
डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा नवनीतनगर येथील पिण्याच्या पाण्याचा पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका रविना माळी, प्रसाद माळी, संदीप माळी, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 

चव्हाण म्हणाले, पूर्वी छोटसी गाव असत त्यावेळी ही पाण्याची समस्या होती. ती सोडविण्यासाठी पूर्वी विहीर खोदून पाण्याची पूर्तता केली जात होती. पण आता वस्ती मोठी झाली. त्यामुळे ठोस नियोजन करणो गरजेचे होते. त्यासाठी बारावी धरणाची उंची वाढविण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्यासाठी धरणाच्या आसपासच्या जमिनी घेवून तेथील नागरिकांचे पुर्नवसन केले. अशा पायाभूत विकास कामांमुळे आता बारावी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता दुप्पट झाली आहे. ठाणो, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवली तसेच ग्रामीण विभागातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावणार नाही. अमृतयोजने अंतर्गत पाण्याच्या पाईप लाईन्स टाकण्याचे काम गावापासून शहरार्पयत सुरू आहे. त्यामुळे आता भविष्यात पाण्यासाठी कोणाच्याही तक्रारी येणार नाहीत. विशेष म्हणजे आज देसले पाडयातील नवनीत नगरात सर्वात प्रथम पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे शुभारंभ होत आहे. विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी आता सर्वजण पुढे येतील पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'सबका साथ सबका विकास' आणि विश्वास धोरणामुळे विकास कामांची पूर्तता होत आहे. आता पाणी मुबलक आहे. आणि ते सर्वाना मिळाले पाहिजे म्हणून सम-पंप योजना आणि मोठ्या  पाणी साठविण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
 
 

अमर माळी म्हणाले, अमृत योजनेमुळे स्थानिक आमदार राजू पाटील, भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण, नगरसेविका रविना माळी यांच्या पाठपुराव्यामुळे नगरवासियांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. पूर्वी रोज २५ ते ३० टंकरने पाणीपुरवठा केला जात होता. पावसाळ्य़ात एक नवीन येथे अधिक पाण्याची लाईन सुरू केली आणि टंकरपाणी बंद केले. पण आता कायमची समस्या दूर होणार आहे. 
रविना माळी म्हणाल्या, या परिसरातील नागरिकांना पाण्याचा फार त्रस सहन करावा लागला. पाण्याचे प्रेशर कमी होते आता नवीन पाईपलाईन टाकण्यास सुरूवात झाली आहे. आता नक्की भरपूर पाणी मिळेल यांचा आनंद होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0