अर्णब गोस्वामी प्रकरणी डोंबिवलीत भाजपाची निदर्शने

04 Nov 2020 22:19:52

BJP Domb_1  H x
 




 
डोंबिवली : ‘ठाकरे सरकार हाय-हाय, लोकशाहीचा गळा घोटणा:या सरकारचा निषेध असो,’ अश्या विविध प्रकारच्या घोषणा देत रिपब्लिक टिव्ही संपादक अर्णब गोस्वामी अटकप्रकरणी भाजपतर्फे डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत भाजपने झालेल्या घटनेचा निषेध नोंदविला. राज्य सरकारने अर्णव गोस्वामी यांना अटक करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना आणि पत्रकारितेला तुरूंगात डांबल्याचे मत भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केले आहे.
 
 
आपले मत व्यक्त करण्याचा हक्क सर्वाना असून राज्य सरकार आपल्या हक्काचा गैरवापर करीत असल्याची टिका करून राज्य सरकारच्या कृतीचा कांबळे यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, जिल्हा सरचिटणीस अजरुन म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष संजीव बिरवाडकर, भाजयुमोचे मिहीर देसाई आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0