“कोरोनाकाळात मुंबईकरांची सेवा भाजपनेच करून दाखवली”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020
Total Views |

Ashish Shelar_1 &nbs
 
मुंबई : कोरोना काळामध्ये राज्यभर जनता त्रस्त होती. यावेळी जनतेसाठी भाजप नगरसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक भाजप नेते आशिष शेलार यांनी केले. याशिवाय ‘प्रजा फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या प्रगती पुस्तकात शिवसेनेपेक्षा भाजप नगसेवकांनी सर्वाधिक काम केले असल्याचे चित्र स्पष्ट झाले. यावर, ‘कोविड काळात मुंबईकरांची सेवा भाजपा नगरसेवकांनीच करुन दाखवली...’ असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे.
 
 
 
 
 
भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे की, “कोविड काळात मुंबईकरांची सेवा भाजपा नगरसेवकांनीच करुन दाखवली. प्रजा फाऊंडेशनकडून शिक्का मोर्तब करण्यात आले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकरांची सेवा करणाऱ्या भाजपा नगरसेवकांचे कौतूक! पण आम्हीच... आमचीच..अशा वल्गना करणारे कुठे होते? सत्ताधारी तेव्हा नातेवाईकांना टेंडर वाटत होते बहुतेक!” असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे . ‘प्रजा फाऊंडेशन’ने मुंबई महानगरपालिकेतील विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या कामगिरीचे २०२० या वर्षांचे प्रगतिपुस्तक जाहीर केले . यामध्ये पहिल्या १० क्रमांकामध्ये शिवसेनेचे दोनच नगरसेवक आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे पाच नगरसेवक आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@