भारत ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान ११ जणांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारताने तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करून मालिका खिशात घातली. यावेळी भारताने पहिला सामना हारून देखील इतर २ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामुळे विराट सेनेनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका २-१ अशी जिंकता आली. परंतु, यादरम्यान पोलिसांनी ११ जणांना अटक केली. या सामन्यावर होणाऱ्या सट्टेबाजीची खबर मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी ११ जणांना ताब्यात घेण्यात आले.

 

येत्या आगामी काळामध्ये क्रिकेट तसेच इतर खेळांवर होणाऱ्या सट्टेबाजीचा राक्षस पुन्हा एकदा डोके वर काढू पाहत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या सामन्यावर २ कोटींचा सट्टा लावण्यात आला होता. यावेळी गुन्हे शाखेने कारवाई करत ११ जणांना ताब्यात घेतले. यांच्याकडून तब्बल ७० मोबाईल, २ टीव्ही आणि सात लॅपटॉप जप्त करण्यात आले. त्यामुळे टी-२० विश्वचषक आणि आयपीएलच्या स्पर्धांमध्येही सट्टेबाजीसारख्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान पोलिसांवर आहे.

@@AUTHORINFO_V1@@