भारतीय सैन्याने पाकचा कट उधळला, ९ जिवंत तोफगोळे केले निकामी

19 Sep 2019 12:25:17



श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बालाकोट सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने आणखी एक पाकिस्तानी कट उधळला आहे. भारतीय सैन्याने पुंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील बालाकोट सेक्टरमधील बासोती आणि बालाकोट या गावात ९ जिवंत तोफगोळे निकामी केले. भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी प्रत्येकी १२० मिमीचे ९ जिवंत तोफगोळे निकामी केले. हे सीमारेषेवरील वेगवेगळ्या भागात आढळून आले. भारतीय लष्कराच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून या ९ तोफगोळे निकामी केले.

 

सीमेवरील तणाव कायम राहावा याकरिता पाकिस्तानी सैन्य वारंवार कट रचत आहे, पण भारतीय लष्कराचे सैनिक प्रत्येक प्रसंगी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत. यापूर्वीही पाकिस्तानाने अशी हरकत केली होती. कलम ३७० रद्द झाल्यापासूनच पाकिस्तानच्या नापाक हरकतींमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडूनही भारताला वारंवार युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. परंतु भारतीय सैन्य पाकिस्तानच्या प्रत्येक हरकतील चोख प्रत्युत्तर देताना दिसून येते.
Powered By Sangraha 9.0