दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ

01 Aug 2019 16:58:01


 


शालेय शिक्षणमंत्री ॲङ आशिष शेलार यांची घोषणा


मुंबई : दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा फी नाही तर प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे. तसेच ही प्रतिपूर्ती आरटीजीएस (RTGS) मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री ॲङ आशिष शेलार यांनी घेतला असून त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

 


 

विद्यार्थ्यांना प्रतिपूर्ती माफ करण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काच्या रकमेत प्रात्यक्षिक शुल्क, गुणवत्ता प्रमाणपत्र शुल्क इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. राज्य मंडळाचे दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे महसूल मंडळ, गाव, तालुका व जिल्ह्याची तसेच विद्यार्थी, पालकांच्या बँक खात्याची माहिती राज्य मंडळ घेणार आहे. महसूल विभागांना दुष्काळी गावांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी जी गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली असतील अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरते वेळी कोणतेही शुल्क भरावे लागू नये याची दक्षता राज्य मंडळ घेणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर महसूल विभागातर्फे जी गावे दुष्काळी म्हणून जाहीर होतील अशा गावातील विद्यार्थ्यांची माहिती प्रत्येक शासन निर्णयानंतर मंडळाच्या संगणक प्रणाली मधून शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना मंडळामार्फत देण्यात येणार आहे.

Powered By Sangraha 9.0