मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी करण्यात आला. राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यावेळी १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा शपथविधी पार पडला.
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर १३ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आली होती. त्यानुसार आज शपथविधी सोहळा पार पडला. काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर दोघांचीही कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, सुरेश खाडे, बाळा भेगडे, परिणय फुके यांनी यावेळी शपथ घेतली. आदिवासी मंत्री विष्णू सावरा, दिलीप कांबळे, राजकुमार बडोले या मंत्र्यांना नव्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.
मंत्रिमंडळात या नवीन मंत्र्यांनी घेतली शपथ
· राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) संभावित कॅबिनेट
· डॉ. संजय कुटे (भाजप) संभावित राज्यमंत्री
· सुरेश खाडे (भाजप) संभावित कॅबिनेट
· योगेश सागर (भाजप) संभावित राज्यमंत्री
· डॉ. अनिल बोंडे (भाजप) संभावित राज्यमंत्री
· अतुल सावे (भाजप) संभावित राज्यमंत्री
· जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) संभावित कॅबिनेट
· आशिष शेलार (भाजप) संभावित कॅबिनेट
· तानाजी सावंत (शिवसेना) संभावित राज्यमंत्री
· परिणय फुके (भाजप) संभावित राज्यमंत्री
· अविनाश महातेकर (रिपाइं) संभावित राज्यमंत्री
· बाळा भेगडे (भाजप) संभावित राज्यमंत्री
· अशोक ऊईके (भाजप) संभावित राज्यमंत्री