ममता सरकार बरखास्त करा - रामदास आठवले

11 Jun 2019 15:03:52



मुंबई : पश्चिम बंगाल मध्ये हिंसाचाराने कळस गाठला असून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास ममता बॅनर्जींचे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील पश्चिम बंगाल राज्यसरकार केंद्राने बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ममता बॅनर्जी यांनी आक्षेपार्ह विधान केलेली आहेत. तसेच त्या संविधानविरोधी गोष्टी करत असून त्यांचे वर्तन हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या खुनाला ममताच असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. यासोबत ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसी बळाचा वापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

 

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार बोकाळला असून येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पश्चिम बंगाल मधील हे गुंडाराज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रोखू शकत नसल्यामुळे तेथील ममता सरकार त्वरित बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी तरच पश्चिम बंगाल मध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था पूर्ववत होईल, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0