
मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या रेपोदर कपातीला प्रतिसाद देत देशातली सगळ्यात मोठ्या भारतीय स्टेट बँकेकडून गृहकर्जाच्या दरात ०.१० % कपात केली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर हा ८.६० ते ८.९० टक्क्यांच्या दरम्यान राहणार आहे. बुधवारपासून हे दर लागू असणार आहेत. त्यामुळे आता कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कच्च्या तेलाची किंमत वाढलेली असतानाही महागाई दर नियंत्रणात आहे, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले. मध्यम आणि छोट्या उद्योजकांसाठी पत वाढ (क्रेडिट ग्रोथ) कमी करण्यात आली आहे. वित्तीय स्थितीवर सतर्क राहणे गरजेचे आहे. खाद्य महागाई दर चांगल्या स्थितीत आहे, असे दास यांनी सांगितले आहे. जानेवारी - फेब्रुवारी या महिन्यांमध्ये निर्यात चांगली राहीली आहे.
गृहनिर्माण क्षेत्रात वित्तव्यवस्था चोख राखण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. एमपीसीची पुढील बैठक ३, ४ आणि ६ जूनला होणार आहे. रेपो दर कमी झाल्यामुळे ईएमआय कमी होणार आहेत. तर, होम लोनचेही ईएमआयदर कमी होणार आहेत. आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये महागाई दर सहा महिन्यात पहिल्यांदा २.९ ते ३.० टक्के झाले आहेत. तर पुढच्या सहा महिन्यात महागाई दर ३.५ ते ३.८ टक्के राहण्याची शक्यता आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat