पहिल्याच दिवशी १४ पदके मिळवून भारताने केली कमाल

03 Dec 2019 16:21:15


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : काठमांडू येथे होत असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने १४ पदके जिंकली. यामध्ये तीन सुवर्ण पदके, आठ रौप्य पदके आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताने तायक्वांदो स्पर्धेत नऊ पदके जिंकली. तसेच भारताच्या पुरुष खो-खो संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

  

बॅडमिंटनमध्ये किदाम्बी श्रीकांतच्या नेतृत्वात भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला ३-१ ने नमवून सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर महिला बॅडमिंटन संघाने विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंकेला ३-० ने हरवून सुवर्णपदक जिंकले आहे. आपला विजयी रथ पुढे हाकताना भारताच्या पुरुष खो-खो संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाने यजमान नेपाळला डाव आणि १२ गुणांनी पराभूत केले.

Powered By Sangraha 9.0