
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ जाहीर केली. या योजनेत शेतकऱ्यांना कोणत्याही निकषांशिवाय सरसकट कर्जमाफी दिली जाईल. मात्र या कर्जमाफी योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. तसेच १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम २ लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास २ लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसून दिलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक असल्याची टीका केली आहे. नेटकऱ्यांनी ट्विट करत या सरकारवर टीका केली.