हिंसाचाराला काँग्रेसच जबाबदार : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2019
Total Views |

Narendra modi _1 &nb

 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून मोदींनी विरोधकांना ठणकावले

 
 

झारखंड :  नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्या पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. ठिकठिकाणी सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांना काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचाच हात असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एका प्रचारसभे दरम्यान त्यांनी उपस्थितांना संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूरी मिळाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालसह देशातील विविध भागांत हिंसाचार घडत आहे. सर्वात वाइट परिस्थिती आसाम आणि मेघालयात आहे. या ठिकाणी पोलिसांचा लाठीमार आणि गोळीबारही झाला आहे.

 

यावर प्रतिक्रीया देताना मोदी म्हणाले, "पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातील अल्पसंख्याकांना भारतात पळून येऊन शरणार्थींचे आयुष्य जगावे लागत आहे. त्यांनाच सन्मान देण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष देशात गोंधळ घालत आहेत."

@@AUTHORINFO_V1@@