मुंबई : अजित पवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबई ते नागपूर असा प्रवास एकाच विमानाने केल्याने राजकीय वर्तूळात याबद्दल चर्चा आहे. त्यांच्यासह दीलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये विमानतळावर चर्चा झाली, अशीही माहिती आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेली धुसफूस खातेवाटपानंतर उघड झाली होती, त्यापार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहीले जात आहे.
अजित पवार यांना भाजपच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देण्यात आले होते. मात्र, महाविकास आघाडीतील सरकारमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे मंत्रीपद अद्याप मिळालेले नाही. अजित पवार यांच्यामागे असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नाराजीचा सूर वेळोवेळी दिसून आला होता. त्यामुळे राज्यात पुन्हा नवी समीकरणे जुळतील का, अशीही चर्चा या निमित्त केली जात आहे.