ईशान्येतील हिंसेमागे काँग्रेसचा हात : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2019
Total Views |


amit_1  H x W:



गिरीडीह
: झारखंड येथील प्रचार रॅलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या भारत बचाव रॅलीत केलेल्या आरोपांवर चोख प्रत्युत्तर दिले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर ईशान्य भारतात अनेक ठिकाणी त्याविरोधात हिंसक आंदोलने होते आहेत. या हिंसेला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष पूर्वीपासूनच हिंदू-मुस्लिम राजकारण, नक्षलवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप शहा यांनी केला आहे.


शहा म्हणाले
, 'आम्ही तिहेरी तलाक कायदा आणला तर काँग्रेसने त्याला मुस्लिमविरोधी म्हटले आणि आता नागरिकत्व दुरुस्ती कायदाही काँग्रेसला मुस्लिमविरोधी वाटत आहे. काँग्रेस ईशान्येत हिंसा भडकवत आहे. प्रत्येक गोष्टीला मुस्लिमविरोधी म्हणणे ही काँग्रेसची जुनी खोड आहे. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात धार्मिक अवहेलना झेलणारे शरणार्थी अनेक वर्षे नर्कातले जीवन जगत आहेत, पण काँग्रेस याला मुस्लिमविरोधी म्हणत आहे. हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही. काँग्रेसला सवयच लागून गेली आहे, सर्व कायद्यांना मुस्लिमविरोधी म्हणण्याची.त्यामुळे आता नागरिकत्व कायदाही मुस्लिमविरोधी असल्याचा कांगावा काँग्रेस करत आहे.'

@@AUTHORINFO_V1@@