
अयोध्येच्या वादग्रस्त जागेबाबत सर्वोच्च न्यायालयातील एक एक युक्तीवाद समोर येत आहेत. बाबरीचा ढाचा असलेल्या ठिकाणी पूर्वी एक वास्तू होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. ती रिकामी जागेवर बांधण्यात आली नव्हती, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बाबरीच्या जागेवर भारतीय पुरातत्व विभागाने उत्खनन करुन अहवाल सादर केला होता. या अहवालात बाबरीचा खाली एक वास्तू असल्याचे म्हटले होते. या वास्तूचे अवशेष इस्लामिक वास्तूरचनेशी मिळतेजुळते नव्हते. तर ते मंदिरासाठी वापरण्यात येणाऱ्या अवशेषांसारखे वाटत असल्याचे नमूद केले होते. २००३ साली पुरातत्व उत्खनन करून सादर केलेल्या या अहवालावर मुस्लिम पक्षकारांनी आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा आक्षेप ग्राह्य धरला नाही आहे.