२०२१ ची जनगणना १६ भाषांमधून केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात दिली. व्यय विषयक वित्त समितीने यासाठी ८७५४.२३ कोटी रुपये खर्चाची शिफारस केली आहे.
गणक मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही जनगणनेची माहिती गणक कर्मचारी गोळा करु शकतात, असे राय यांनी सांगितले. जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. घर-यादी आणि घर गणना एप्रिल ते सप्टेंबर २०२० मध्ये करण्यात येईल आणि लोकसंख्या गणना ९ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान होणार आहे.
भारत हा विविधतेने नटलेला देश असल्यामुळे आपल्या देशात अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या भाषेचा अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या भाषेचे जतन करता यावे आणि त्यासाठी त्यांना कळेल अशा भाषेमध्ये त्यांची जनगणना व्हावी या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला असावा. त्यामुळे देशाचे भाषा सौंदर्य आणि संस्कृती जपण्याचा देखील या निमित्ताने ही एक स्वागतार्ह बाब आहे असे म्हणावे लागेल.