राजभवनावर मोर्चा : बच्चू कडू ताब्यात !

14 Nov 2019 12:46:25




मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसंदर्भात राज्यपालांकडे मागणी करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चा पोलीसांनी अडवला आहे. या आंदोलन व मोर्चासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगत पोलीसांनी हा मोर्चा अडवला. आमदार बच्चू कडू यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यासह प्रहार जनशक्ती पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांनाही यावेळी ताब्यात घेण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी पोलीसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता.

 

दरम्यान, बच्चू कडू यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. 'आम्ही पुन्हा आंदोलन करू,' असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. या प्रकारामुळे राजभवन परिसरात सकाळपासून एकच गोंधळ उडाला होता. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. अटकेपूर्वी बच्चू कडू यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तरीही मोर्चा काढल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0