मुंबई (प्रतिनिधी) - शिवसेनेचे वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. वरळीत आदित्य ठाकरे यांचा बोलबाला असून त्यांनी विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. आदित्य ठाकरे यांना १ लाख मतांनी जिंकवून देण्याचा शिवसैनिकांचा मानस असून सध्या ते १६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांचा करिश्मा वरळीत विधानसभेत होताना दिसत आहे. शिवसेनेकरिता या मतदारसंघातील विजय प्रतिष्ठेचा आहे. ठाकरे घरण्यातील पहिलीच व्यक्ती या मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उभी राहिली आहे. मतमोजणीत जनतेचा कौल आदित्य यांना मिळत असल्याचेही दिसत आहे. या मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी होण्यासाठी शिवसेनेेने सुरुवातीपासूनच अनेक राजकीय कुरघोड्या केल्या. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते सचिन आहेर यांचा शिवसेना प्रवेश त्यामधील एक कुरघोडी होती. आता आदित्य यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांनी १६ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर अभिजीत बिचुकले यांना वरळीकरांनी ठेंगाच दाखविला आहे.