भुसावळात कुत्र्यांवर संक्रांत

22 May 2018 14:02:21

रानातला महादेव मंदिर परिसरातील श्‍वान गायब 

भुसावळ. २२ मे :
शहरात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. रात्रह जामनेर रोडवरुन जाणार्‍या वाहनधारकांना श्‍वानांचा त्रास व्हायचा. तर गल्ली बोळात असलेले श्‍वान हे त्या परिसराचे वाचमन म्हणून अप्रत्यक्षपणे काम करत होते. पण दोन दिवसांपुर्वी गोरक्षण, रानातला महादेव मंदिर परिसर, आनंद नगर, इंदिरा नगर येथील कुत्री गायब झाली आहेत.
 
 
गल्लीबोळातील कुत्रे हे त्यांच्या परिसरात अनोळखी व्यक्तींना सहजासहजी घुसू देत नाहीत. त्यामुळे चोरट्यांना सहज प्रवेश मिळ नसतो.पण दोन ते तीन दिवसांपुर्वी या परिसरातील कुत्रे अचानक गायब झाले.बेवारस श्‍वानांना त्यापरिसरातील नागरिक खाद्य देत असल्याने ईमानदारीसाठी साठी प्रसिध्द असलेले श्‍वान गल्लीचे रक्षण करतात असा सर्वसाधारण समज आहे.
 
 
बेवारस कुत्री ही सर्वत्र निर्माण झालेली मोठी समस्या आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन कायद्यानुसार अशा कुत्र्यांना ठार मारता येत नाही. पण कुत्र्यांना ताब्यात घेवून त्यांचे र्निबीजीकरण करता येते.
 
 
परंतु श्‍वान अचानक नाहिसे होण्यामागे नेमके कारण कोणते याचा शोध प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. अन्यथा एखादी अप्रिय घटना घडविण्यासाठी श्‍वानांचा अडथडा नको म्हणून त्यांना ठार मारण्यात आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
शहरात काही ठिकाणी कुत्रे मरुन पडलेले आहे.त्यामुळे र्दुगंधी पसरली असल्याची नागरिकांची तक्रार होती. त्यामुळे पालिकेच्या पशु शववाहिनेच्याव्दारे कुत्र्यांच्या मृत शरीरांची विल्हेवाट लावण्यात आली. - मेघा वाणी, आरोग्य सभापती, भुसावळ नगर परिषद
 
 
शहरात काही वर्षापुर्वी चोरीच्या घटनांसाठी तुटलेले ढापे हे एक कारण होते. बाजारपेठ पो.स्टे.चे तत्कालीन पो.नि. स्व.प्रदीप देशमुख यांनी त्याबाबत नगरपालिकेला पत्र दिले होते की, तुटलेल्या ढाप्यांमुळे पोलिसांना गस्तीवरील वाहन चालविणे अडचणीचे होते. त्यामुळे त्या - त्या परिसरात गस्त करण्यास विलंब होतो तरी त्वरीत ढापे दुरुस्त करावे असा उल्लेख होता.
Powered By Sangraha 9.0