अशोककुमार चौधरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित

    26-May-2017
Total Views | 21



भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अशोककुमार वसंतलाल चौधरी यांचा कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्र्यांच्याहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. हा पुरस्कार राज्य शासनाकडून देण्यात आला आहे.


कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी कोल्पापूरचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर हसीना फरास, जि.प.अध्यक्षा सौमिका महाडिक यांच्यहस्ते अशोककुमार चौधरी यांचा सपत्नीक २५ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला.


डॉ.बाबासहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त असलेल्या या सोहळ्यात राज्यातील १२५ समाजसेवकांना गौरविण्यात आले.पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121