मोदींनी मानले सोलापूरकरांचे आभार

17 May 2017 20:03:52

केंद्र सरकारच्या गेल्या तीन वर्षांतील अनेक यशस्वी योजनांपैकी एक योजना म्हणजे 'गिव्ह इट अप' योजना. योजना जाहीर झाल्यापासूनच देशातील अनेक लोकांनी त्यात सहभागी होण्याविषयी उत्सुकता दाखवली होती. अपेक्षेप्रमाणे त्या लोक सहभागीही झाले. आता या सर्व लोकांचे आभार मानायचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवले आहे. त्यासाठी तसे प्रत्यक्ष त्यांचे पत्रच लोकांना देण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातून अनेक जणांनी यात सहभाग नोंदवला होता. त्या सर्वांनाच आता अशी आभारपत्रे वाटण्यात येत आहेत. "महाराष्ट्रातून आणि सोलापूर जिल्ह्यातून या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही आता सर्वांचे आभार मानायचे ठरवले आहे. त्यासाठीच अशा आभारपत्रांचे वाटप आम्ही सुरू केले आहे." असे भारत गॅसचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी विजय सेहगल यांनी महाएम.टी.बी.कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

Powered By Sangraha 9.0