औरंगाबाद शहरात जमावबंदी व शस्त्रबंदी

27 Apr 2017 21:57:48


 

औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी औरंगाबाद मधील प्रभारी पोलीस आयुक्तांनी जिल्ह्याच्या शहरी हद्दीत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश लागू केला आहे. अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये हा आदेश लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून घडत असणाऱ्या काही तणावपूर्ण घटनांमुळे हा आदेश लागू करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्हयाच्या शहरी हद्दीत 12 मे 2017 पर्यंत हा आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश लागू असताना विवाहासारख्या कार्यक्रमांना विशेष परवानगी घेतल्यावर सुट दिली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

या आदेशाचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन औरंगाबाद शहर पोलिसांनी केले आहे.

Powered By Sangraha 9.0