देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी उद्योजकांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटच्या माध्यमातून हातभार लावावा असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले आहे. भारतीय उद्योजक महासंघाच्या अर्थात सीआयआयच्या नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पारितोषिक वितरण समारंभात ते आज बोलत होते. यावेळी मुखर्जी यांच्या हस्ते प्रसिद्ध उद्योगपती राहूल बजाज यांचा सीआयआय अध्यक्षीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सीआयआय फाऊंडेशन आदर्श महिला पुरस्कारांचेही वितरण मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी, सीआयआयचे अध्यक्ष आणि फोर्ब्ज मार्शलचे उपाध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्ज यांच्यासह उद्योग जगतातील विविध मान्यवर उपस्थित होते.