मुंबई : (Central Railway) मध्य रेल्वेने चंद्रपूर यार्ड येथील रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण यशस्वीरित्या हटवले आहे. ज्यामुळे वर्धा-बल्लारशाह तिसरी लाईन आणि चंद्रपूर-चंदा फोर्ट कॉर्ड लाईन प्रकल्पांच्या प्रगतीत अडथळा येत होता.
चंद्रपूर-बल्लारशाह सेक्शनमध्ये किमी ८७७/५६० आणि किमी ८७८/१०० दरम्यान असलेले हे अतिक्रमणाचे ठिकाण प्रकल्प अंमलबजावणीसाठी सर्वात आव्हानात्मक ठिकाणांपैकी एक होते. एकूण ३१७.५० चौरस मीटरचे अतिक्रमित क्षेत्र मोकळे करण्यात आले, ज्यामध्ये १२ अतिक्रमित बांधकामे हटवण्यात आली.
नागपूर विभाग, बांधकाम विभाग, चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सातत्यपूर्ण समन्वय आणि संयुक्त प्रयत्नांमुळे ही कामगिरी शक्य झाली. सतत संवाद, चर्चा आणि मनधरणीद्वारे, बाधित व्यक्तींसोबत एक परस्पर-मान्य तोडगा काढण्यात आला.
सर्व महत्त्वपूर्ण अतिक्रमणे हटवल्यामुळे रेल्वे मार्गाच्या संरेखनासाठी आवश्यक असलेली जमीन आता उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे वर्धा-बल्लारशाह तिसरा मार्ग प्रकल्प आणि चंद्रपूर-चंदा फोर्ट कॉर्ड लाईन प्रकल्पाची सुरळीत अंमलबजावणी शक्य झाली आहे.
या घडामोडीमुळे प्रकल्पाच्या कामांना गती मिळण्याची आणि प्रकल्प जलदगतीने पूर्ण होण्यास महत्त्वपूर्ण हातभार लागण्याची अपेक्षा आहे. तसेच, या प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधा, परिचालन कार्यक्षमता आणि भविष्यातील वाहतूक क्षमता वाढण्यासही मदत होईल. (Central Railway)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.