कामगार व उद्योगांच्या हितासाठी नवीन संहितांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक - मंत्री ॲड. आकाश फुंडकर

    17-Jun-2026   
Total Views |
Akash Fundkar)
 
मुंबई : (Akash Fundkar) बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून सहभागी अधिकारी हे केवळ प्रशिक्षणार्थी न राहता ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून उदयास यावेत आणि कामगार विभागातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत नवीन कामगार कायद्यांचे ज्ञान पोहोचवावे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.
 
परळ येथील ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित ‘नवीन कामगार संहिता आणि कामगार कायद्यातील बदल’ या विषयावरील चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, "कामगार विभाग हा शासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे.
 
हेही वाचा :  कौटुंबिक जमीन वाटणीची मोजणी होणार आता अवघ्या २०० रुपयांत!
 
कामगारांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि उद्योगांच्या प्रगतीसाठी विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेने आणि कार्यक्षमतेने पार पाडाव्यात. नवीन कामगार संहितांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांचा लाभ कामगार आणि उद्योग या दोन्ही घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे."
 
राज्यातील विविध विभागांतून आलेले कामगार विभागाचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नवीन कामगार संहितांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित अधिकारी वर्ग हीच खरी ताकद असल्याचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.(Akash Fundkar)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....