मुंबई : (Ashish Shelar Statement) पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसचा तंबू उखाड दिया, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी माध्यमांना दिली.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "आज एक अभूतपूर्व यश आपल्या डोळ्यासमोर दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवणारा निकाल या राज्यातील निवडणूकांमध्ये दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसचा तंबू उखाड दिया. ममता बॅनर्जी यांचे कुराज्य आणि त्यांच्या राज्यात होत असलेले नागरिकांवरचे अन्याय, अत्याचाराच्या विरोधात बंगालच्या मतदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक मोठा जनादेश भाजपला दिला."(Ashish Shelar Statement)
ते पुढे म्हणाले की, "आसाममध्ये मतदारांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात भाजपवर विश्वास दाखवला. पुदुच्चेरीमध्येसुद्धा एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करत आहे. जनतेने विरोधकांना नाकारल्याचे चित्र दिसत आहे. केरळमध्येही भाजपच्या जागांची वाढ हळूहळू दिसेल. तामिळनाडूमध्ये डीएमकेचा पराभव दृष्टीक्षेपात दिसतो आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदूस्थान भाजप आणि एनडीएसोबत उभा असून संपूर्ण देशभरात आम्ही याचा आनंद साजरा करतो आहोत."(Ashish Shelar Statement)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....