राज्य कसे केले पाहिजे याचा आदर्श अहिल्यादेवी होळकर यांनी ठेवला - देवेंद्र फडणवीस; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
31-May-2026
Total Views |
मुंबई: (Ahilyadevi Holkar Jayanti) "राज्य कसे केले पाहिजे याचा आदर्श ज्यांनी आपल्यासमोर ठेवला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मी नमन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या देशात ज्यांनी हिंदू अस्मिता जागृत ठेवली.ज्यांनी अनेक आक्रमणानंतर सनातन धर्म जिवंत ठेवला. लोकशासन आणि लोकप्रशासन कसा असू शकत याच आदर्श उदाहरण छत्रपती शिवरायांच्या नंतर दिले. अशा पुण्यश्लोक हिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्याकरता आम्ही सर्व लोक इथे एकत्रित आलो आहोत."असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि. ३१ रोजी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar Jayanti) यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी (ता.जामखेड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अभिवादन केले.
याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक येथे जाऊन दर्शन घेतले.
" मागील वर्षी आम्ही अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी मध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली. महाराष्ट्रातील जेवढी शक्ती स्थळ आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केला आणि जे निर्णय आम्ही इथे घेतले ती सर्व कामे सुरू केली आहेत. आणि इथलाही विकास आराखडा मंजूर झालेला आहे.
प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वात इथ सर्व गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. फक्त आचारसंहिता सुरू असल्याने आम्हाला भूमिपूजन करता आले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही भूमिपूजन करू. "असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.(Ahilyadevi Holkar Jayanti)