Mumbai Janseva Contact Center : नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी 'दिवसरात्र जनसेवा संपर्क केंद्र'

मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना; आ. अमीत साटम यांच्या हस्ते आज उद्धाटन

    02-May-2026   
Total Views |

Mumbai Janseva Contact Center   
 
मुंबई : (Mumbai Janseva Contact Center) कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी अत्याधुनिक 'दिवसरात्र जनसेवा संपर्क केंद्र' सुरू करण्यात येणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या शुभहस्ते गावदेवी येथील सुधीर फडके चौक, ह्युजेस रोड, धरम पॅलेस इथे आज (दि. ३ मे) संध्याकाळी ७ वाजता या जनसेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.(Mumbai Janseva Contact Center)

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "या संपर्क केंद्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना २४ तास प्रशासनाशी थेट संपर्क साधता येणार असून, विविध शासकीय सेवा, तक्रारी आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या काळ वेगाने बदलत आहे. त्यानुसार नागरिकांच्या समस्यांचे स्वरूपही बदलत असून त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी दिवस रात्र चोवीस तास जनसेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना त्यांच्या अडचणींसाठी वारंवार कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत यासाठी अनेक अडचणींची तक्रार ऑनलाइनही केली जाऊ शकते. या अनुषंगाने नागरिकांना मार्गदर्शन व्हावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे."(Mumbai Janseva Contact Center)

हेही वाचा : पुणे जिल्ह्यातील घटना निंदनीय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   
 

ते पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपला महाराष्ट्र प्रगतीपथावर असून त्यांच्या मार्गदर्शनात अनेक सेवा या ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सेवांची माहितीही या केंद्रात देण्यात येईल. महापालिकेशी संबंधित समस्या, म्हाडा, एसआरए, म्हाडा दुरुस्ती मंडळ, रेशनिंग कार्ड, वीज पुरवठा, तसेच पोलिस विभागाशी संबंधित तक्रारींचे संदर्भ तसेच विविध आवश्यक दाखले ही मिळवून देण्याचे काम या जनसेवा केंद्रात होणार आहे."(Mumbai Janseva Contact Center)

  

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....