ओळखपत्राशिवाय नेपाळमध्ये ‘नो एन्ट्री’

    11-May-2026
Total Views |
Government Of Balen
 
काठमांडू : (Government Of Balen) नेपाळमधील बालेन सरकारने भारतीय नागरिकांसाठी नवा नियम लागू केला आहे. आता नेपाळमध्ये जाणार्‍या भारतीय नागरिकांकडे ओळखपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 
तसेच, नेपाळमधून भारतात येणार्‍यांनाही आपले परिचयपत्र दाखवावे लागणार आहे. आधारकार्ड किंवा सरकारने जारी केलेले इतर कोणतेही वैध ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरले जाईल. नेपाळ प्रशासनाने शनिवार, दि. ९ मे रोजी या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
 
हेही वाचा :  PM Narendra Modi Economic Appeals : “आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे मोठे आवाहन; पेट्रोलपासून सोन्यापर्यंत ‘हे’ खर्च तात्काळ कमी करा!”
 
नवा नियम लागू झाल्यानंतर शनिवारी जोगबनी येथील भारत-नेपाळ सीमेवर दिवसभर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.(Government Of Balen)