मुंबई : (Noida violence case) नोएडा हिंसाचार प्रकरणात (Noida violence case) उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक खुलासा झाला असून, जाळपोळ आणि दगडफेक करणारे बहुसंख्य लोक हे कारखान्यातील कामगार नसून बाहेरील असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत झालेल्या ६६ अटकांपैकी ४५ जण बाहेरील असल्याचे आढळले आहे. या खुलाशानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपद्रवींविरोधात अत्यंत कठोर भूमिका घेत कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.(Noida violence case)
पोलिस तपासानुसार, १३ एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारात कामगारांना भडकवण्यासाठी आणि आगजनी घडवून आणण्यासाठी एका संघटित जाळ्याने काम केले. अटक करण्यात आलेल्या काही जणांचे ‘मजदूर बिगुल’ आणि अर्बन नक्षल नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आगजनीसाठी ओळखल्या गेलेल्या ११ आरोपींपैकी ८ आणि हिंसा भडकवणाऱ्या १९ जणांपैकी बहुतेक आरोपी हे प्रत्यक्ष कर्मचारी नव्हते. हे लोक स्वतःला कामगार म्हणून दाखवत गर्दीत सहभागी झाले आणि वातावरण बिघडवले.(Noida violence case)
प्रकरणाचा (Noida violence case) आढावा घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जे लोक कामगार नसूनही हिंसाचारात सहभागी झाले, त्यांच्या छायाचित्रांना सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावे. तसेच, सोशल मीडियावर देखरेख वाढवण्याचे आणि अफवा पसरवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. खऱ्या कामगारांच्या हिताचे संरक्षण केले जाईल, मात्र बाहेरील कटकारस्थान करणाऱ्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. सध्या पोलिस या संपूर्ण जाळ्याचा आणि निधीपुरवठ्याचा सखोल तपास करत आहेत.(Noida violence case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक