मुंबई : (Melghat Accident) अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बोलेरो पिकअप खोल दरीत कोसळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये एका महिलेचा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आठवडी बाजारावरून परत येत असताना शिवझरी ते राणीगाव दरम्यान हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
जखमींना तात्काळ उपचारासाठी धारणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातातील सर्व मृतक कंजोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\