राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, "आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो. या प्रक्रियेत जी काही सोडत झाली ती नियमानुसार झाली असून आता नियमानुसार मुंबईत महायुतीचा महापौर बसेल."(Ashish Shelar)
"महायुतीत कुठलाही बेबनाव किंवा अंतर्गत संघर्ष नाही. मी एवढेच म्हणेन की, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. आमची कुठलीही अडचण नाही. महायुतीमध्ये अडचणीचा प्रश्नच येत नाही. संजय राऊत यांच्या राजकीय बौद्धिक पातळीत लोचा आहे, तो त्यांनी बघावा," अशी टीकाही त्यांनी केली. (Ashish Shelar)
तसेच मुंबईच्या विकासासाठी सर्वांच्या सुचनांचे स्वागत
"मुंबईच्या सेवेसाठी सगळ्यांच्या सूचना आणि अनुभव आम्हाला महत्वाचा वाटतो. पुढची पाच वर्षे आम्ही महायुती म्हणून सेवा करणार आहोत. त्यात बाळा नांदगावकर, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस या सर्वांच्या सूचनांचेही आम्ही स्वागत करू," असेही मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....