मुंबई : (Badruddin Ajmal) ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) चे प्रमुख मौलाना बदरुद्दीन अजमल (Badruddin Ajmal) यांनी आसाम काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केल्याचे निदर्शनास आले आहे. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी काँग्रेसने ऐतिहासिकदृष्ट्या कधीही काम केले नाही, उलट त्यांना केवळ मतपेढी म्हणून वापरले, असा आरोप त्यांनी एका पत्रकार परिषदेतून केला आहे. थेट राजकीय हल्ला चढवत अजमल (Badruddin Ajmal) यांनी काँग्रेस नेतृत्वावर मुस्लिमांच्या जीवन व हक्कांबाबत उदासीनता दाखवल्याचा आरोप केला.(Badruddin Ajmal)
अजमल (Badruddin Ajmal) यांनी दावा केला की, संकटाच्या काळात विशेषतः अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचे काँग्रेसने सातत्याने टाळले. आसाममध्ये अलीकडे झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमांचा संदर्भ देत त्यांनी आरोप केला की, अल्पसंख्याक कुटुंबांवर परिणाम होत असताना काँग्रेस नेतृत्व गप्प बसले. अतिक्रमणाच्या वेळी एकाही काँग्रेस नेत्याने आमच्यासाठी आवाज उठवला नाही किंवा अल्पसंख्याक हितांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला नाही, असे म्हणत त्यांनी निर्णायक क्षणी पक्षाने आपला पारंपरिक आधार सोडल्याचा आरोप केला.(Badruddin Ajmal)
निवडणुकीतील फायद्यासाठी अल्पसंख्याकांना 'भ्रमित' ठेवण्यासाठी नजरकैद छावण्या, परदेशी नागरिकांचा प्रश्न, इ. अशा मुद्द्यांबाबत त्यांना जाणूनबुजून शिक्षित केले गेले नाही, असेही अजमल (Badruddin Ajmal) यांनी सांगितले.(Badruddin Ajmal)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक