उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात जवळच्या बिल्डरांना १२ हजार कोटींची खैरात वाटली - मंत्री आशिष शेलार

    23-Sep-2025   
Total Views |

मुंबई : उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात जवळच्या बिल्डरांना १२ हजार कोटींची खैरात वाटली असून महापालिकेच्या ठेवीत तीच १२ हजार कोटींची घट आजतागायत कायम आहे, असा आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी केला.
'एक्स' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामध्ये जवळच्या बिल्डरांना १२ हजार कोटींची खैरात वाटली. महापालिका तिजोरीवर हा जो व्हाईट कॉलर डल्ला मारला त्याचा खड्डा आजपर्यंत भरुन निघालेला नाही. आज समोर आलेल्या माहिती नुसार महापालिकेच्या ठेवीत तीच १२ हजार कोटींची घट आजतागायत कायम आहे. गेल्या पंचवीस वर्षात कारभाऱ्यांनी जी लूटमार केली त्याचे मुंबईवर झालेले व्रण, जखमा आणि खड्डे कायम आहेत. हे खड्डे कायमस्वरूपी मिटवून टाकायची संधी मुंबईकर हो लवकरच तुमच्या हाती येणार आहे. मुंबईची भ्रष्टाचारी अंधाराची रात्र संपणार आहे," असे ते म्हणाले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....