चार वर्षांत आसाम सरकारद्वारा १.२९ लाख बिघा जमीन अतिक्रमणमुक्त! आसाम आंदोलनातील हुतात्मांचा लवकरच बदला घेणार, सरकारचा बांग्लादेशी घुसखोरांना इशारा

    22-Jul-2025   
Total Views |

मुंबई : आसाममधील सुमारे २९ लाख बिघा जमीन 'बांगलादेशी घुसखोर आणि बंगाली मुस्लिमांनी' व्यापलाचा मोठा दावा राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. ते म्हणाले, २०२१ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जमीन रिकामी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती. गेल्या ४ वर्षांत सरकारने १.२९ लाख बिघा अतिक्रमित जमीन मुक्त केली असून आता या जमिनीचा मोठा भाग जंगले निर्माण करण्यासाठी आणि राज्यातील लोकांसाठी वापरला जात आहे.

आसामच्या दरंग जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, गोरुखुटी बहुउद्देशीय कृषी प्रकल्प २०२१ मध्ये सुरू करण्यात आला होता, ज्याअंतर्गत आतापर्यंत ७७,४२० बिघा जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे. हे बहुतेक बंगालमधील मुस्लिमांनी व्यापलेले होते. दारंग जिल्ह्यातील मोहिमेच्या यशानंतर बोरसोल्ला, लुमडिंग, बुरहापहाड, पाभा, बटादरा, छप्पर आणि पैकन येथेही ही मोहीम राबवण्यात आली. अशा गेल्या ४ वर्षांत, आम्ही १.२९ लाख बिघा अतिक्रमित जमीन मुक्त केली

ते पुढे म्हणाले, "जर कोणाला असे वाटत असेल की दोन-तीन सरकार घाबरेल आणि थांबेल, तर ते चुकीचे आहे. आसाम चळवळीतील हुतात्मांचा नक्कीच बदला घेतला जाईल. १९८३ ते १९८५ दरम्यान झालेल्या आसाम आंदोलनादरम्यान, लोकांना पराभवाची भावना निर्माण झाली होती आणि अनेकांनी काँग्रेससमोर शरणागती पत्करली, ज्यामुळे राज्यातील राजकारणाची दिशा बदलली.

१९८० च्या दशकात आसाममध्ये झालेल्या आंदोलनात सुमारे ८५५ लोकांना ठार मरल्याची माहिती आहे. आसाममधून अवैध परदेशी लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाकडे मोठा राजकीय आणि सामाजिक संघर्ष म्हणून पाहिले जाते.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक