नाशिकहून उद्यापासून ३५ नव्या विमानसेवा

    01-Apr-2025
Total Views | 40
 
 35 new flights from Nashik from tomorrow
 
 
नाशिक: ( 35 new flights from Nashik from tomorrow ) नाशिक येथून बुधवार, दि. २ एप्रिल रोजीपासून तामिळनाडूतील कोइम्बतूरसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिकहून देशातील या प्रमुख औद्योगिक शहरात अवघ्या चार तासांत पोहोचता येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून दि. ३१ मार्च रोजीपासून देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू होणार आहे.
 
यामध्ये तिरुपती, श्रीनगर, चंदीगढ, गुवाहाटी, कोइम्बतूर, कोलकाता, अयोध्या, दरभंगासह ३५ प्रमुख शहरांचा समावेश आहे. सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून ‘इंडिगो’ या हवाई कंपनीकडून नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, गोवा, इंदोर, बंगळुरु, जयपूर आदी शहरांसाठी विमानसेवा दिली जाते. त्यात दि. ३१ मार्च रोजीपासून ३५ नव्या सेवांचा समावेश होणार आहे.
 
ओझर विमानतळावरून सध्या ‘इंडिगो’कडून दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु, अहमदाबाद, इंदोर, गोवा याठिकाणी नियमित विमानसेवा दिली जात आहे. दरम्यान, या शहरांना जोडणार्‍या विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता हॉपिंग फ्लाईटने देशविदेशांतील शहरांना जोडणार्‍या विमानसेवेचे कंपनीच्यावतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
 
दि. ३० मार्च ते दि. २५ ऑक्टोबर रोजीपर्यंत हे वेळापत्रक लागू असेल. या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरु या विमानतळांवरून बेळगाव, चंदीगढ, दरभंगा, कोझीकोड, देहरादून, जबलपूर, गया, पंचनगर, विजयवाडा, विशाखापट्टणम, मदुराई आदी शहरांसाठी ’कनेक्टिंग’ विमानसेवेचा लाभ नाशिककरांना घेता येणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121