दापोली, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईत उबाठा गटाला खिंडार! अनेक बडे नेते शिवसेनेत दाखल

    18-Mar-2025
Total Views |
 
Eknath Shinde
 
मुंबई : दापोली, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील उबाठा गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, १८ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 
दापोलीतील उबाठा गटातील संजय कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथील माजी आमदार आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबीर भाई खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, मा. जि. प. सदस्य बादशाह पटेल, मा. पं. स. सभापती राजूनाना मगर यांच्यासह इतर सर्व लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी आणि डॉ. राजू डोंगरे, राम हरी जाधवे, बाबासाहेब जगताप इत्यादी नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 
हे वाचलंत का? -  हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अन्यथा...; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात कडाडले
 
यासोबतच यावेळी मुंबईतीलसुद्धा अनेक पक्षप्रवेश झालेत. भांडुप येथील माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूर येथील माजी नगरसेविका अंजली नाईक, गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखप्रमुख, महिला सेना आणि शिवसैनिक शिवसेनेत दाखल झाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121