दिल्लीत पराभव दिसू लागला! राहुल गांधींकडून पुन्हा रडीचा डाव! महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर बोट
निवडणूक आयोग मेल्याचे संजय राऊतांचे बेताल वक्तव्य
07-Feb-2025
Total Views | 100
नवी दिल्ली : राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. महायुतीने एक हाती विजय मिळवत महाविकास आघाडीला पाणी पाजले. त्यानंतर दिल्ली विधानसभा मतदारसंघात काही एक्झिट पोलने भाजपच विजयी होणार असल्याचा दावा केला. दिल्लीतील पराभव लक्षात घेता आता राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित केले.
पत्रकार परिषदेत फेराफेरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांनी एकामागोमाग एक आकडेवारी सादर करत त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतांबाबत त्यांनी अभ्यास केला असल्याचा दावा केला. महाराष्ट्रात असलेले व्होटिंग पॅटर्न आम्ही तपासला असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. या मतांमध्ये काहीतरी अनियमितता आढळून आली असा निरर्थक आरोप राहुल गांधी यांनी केला. पाचच महिन्यामध्ये मतदरांची लाट, एवढे मतदार कसे वाढले? असा सवाल त्यांना पडला आहे.
तसेच काही मतदारांची नावे मतदार यादीतून वगळून लावल्याचे बेताल वक्तव्य त्यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यात मुस्लिम, दलित आणि आदिवासी समाजातील मतदारांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही निवडणूक आयोगाला विचारल असता कोणतेही उत्तर दिलेलं नाही. यातूनच राहुल गांधी हे तर्क वितर्क लावत असल्याचे बोलले जात आहे. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींचा पराभव निश्चित असल्याची शंका नाकारता येणार नाही. यामुळे त्यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर मतदान घोटाळ्याचा निरर्थक दावा करण्यास सुरुवात केली. निवडणुकीच्या मतदानामध्ये वाढ कशी झाली या प्रकरणावर चौकशी व्हावी असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, यावेळी बोलतेवेळी त्यांनी प्रौढ मतदारांहून इतर मतदान सर्वाधिक कसे काय? असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला.
दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेस संबोधन करताना ते म्हणाले की, राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीवरुन संजय राऊत यांनी निवडणूक आयोगांना खोटे ठरवले आहे. निवडणूक आयोग योग्य ते उत्तर देणार नाही. निवडणूक आयोग हा सरकारची गुलामी करणार असल्याचा दावा करण्यात आला. यावेळी बोलत असताना त्यांनी आपले सर्व भान सोडत निवडणूक आयोग हा मेला असल्याचे बेताल वक्तव्य केले.