रॅगिंगच्या बहाण्याने एसएफआयच्या गुंडांकडून बाटलीत थुंकत पाणी पाजण्यास केली जबरदस्ती
केरळातील विद्यालयात घडला विचित्र प्रकार
19-Feb-2025
Total Views |
तिरुवनंतपुरम : केरळातील (Kerala) सत्ताधारी सीपीआयची विद्यार्थी संघटना असलेल्या एसएफआयच्या सात सदस्यांनी तिरूअनंतपुरममध्ये एका सरकारी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. या सात जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अरिअवट्टम सरकारी महाविद्यालयाच्या अँटी-रॅगिंग सेलने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर अहवाल सादर केला. यानंतर निलंबित करण्यात आले आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ११ फेब्रुवारी कॅम्पसमध्ये वरिष्ठ आणि ज्युनिअर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर या घटनेत जखमी झालेल्या पहिल्या वर्षात विद्यार्थ्याला पकडत संघटनात्मक कामांसाठी एसएफआय वापरत असलेल्या खोलीत नेले असे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे.
त्याने आरोप केला आहे की, त्यानंतर वरिष्ठांनी मारहाणही केली. जवळजवळ एक तासभर त्याच्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. जेव्हा त्याने पाणी मागितले तेव्हा एका वरिष्ठाने पाण्याच्या बाटलीमध्ये थुंकत ते पाणी दिले. ते पाणी पिण्यास जबरदस्ती केली. त्यानंतर ते पाणी पिण्यास नकारही देण्यात आला. मात्र, नंतर त्याला आणखी मारहाण करण्यात आली, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हे प्रकरण आता पोलिसांच्या हाती देण्यात आले आहे. अँटी-रँगिग रोलने तक्रारीची तपाणी केली आणि आरोपींची सतत्या पडताळण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जात आहेत. पोलिसांनी केरळ रॅगिंग प्रतिबंधक एसएफआयला टीकेचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर आता त्याच्या नेतृत्वाने या घटनेमध्ये त्यांच्या सदस्यांना सहभागाबाबत माफीही मागण्यात आली आहे.