शरद पवार आम्हाला पितासमान! पवारांवरील टीकेनंतर संजय राऊतांचा युटर्न

    14-Feb-2025
Total Views | 70
 
Sanjay Raut
 
मुंबई : शरद पवार आम्हाला पितासमान असून आम्ही फक्त आमची भूमिका मांडली, असा युटर्न संजय राऊतांनी घेतला आहे. शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार मिळाल्याने राऊतांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी यावर सारवासारव केली आहे.
 
संजय राऊत म्हणाले की, "माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहिती नाही. शरद पवार साहेब आम्हाला पितासमान आहेत. पण मी माझ्या पक्षाची एक भूमिका मांडली. मी त्यांच्यावर टीका केली नाही तर माझ्या पक्षाची भूमिका मांडली. महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार एखादी खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गवगवा होतो. एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार देणे हा स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे. शरद पवारांनी तिथे जाणे महाराष्ट्राला आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना रुचलेले नाही. शरद पवार मोठे नेते आहेत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  विदर्भातही उबाठाला मोठा धक्का! बड्या नेत्याचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
 
शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, यावरून संजय राऊतांना पोटशूळ उठला. "ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली त्यांना शरद पवारांनी सन्मानित केल्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचे दिल्लीचे राजकारण काय आहे ते माहित नाही. पण आम्हालासुद्धा थोडे राजकारण कळते," अशी टीका संजय राऊतांनी केली होती. मात्र, आता शरद पवार आण्हाला वडीलांसमान असल्याचे सांगत राऊतांनी सारवासारव केली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121