काँग्रेसच्या राजघराण्याने राष्ट्रपतींसह संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    01-Feb-2025
Total Views | 174
 
Fadanvis
 
मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान हा केवळ त्यांचाच नाही तर संपूर्ण आदिवासी समुदायाचा आणि देशाचाही अपमान आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजघराण्याने राष्ट्रपतींसह संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 
 
 
काँग्रेस नेते सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान हा केवळ त्यांचाच नाही तर संपूर्ण आदिवासी समुदायाचा तसेच देशाचाही अपमान आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावर सोनिया गांधी यांनी केलेले अपमानजनक विधान अत्यंत निषेधार्ह आहे."
 
एकीकडे राजघराणे हातात संविधानाच्या नावाने लाल किताब घेऊन नाटक करत आहे. तर दुसरीकडे, हेच राजघराणे देशातील सर्वोच्च संवैधानिक पद भूषवणाऱ्या आणि आदिवासी समुदायातून येणाऱ्या देशाच्या राष्ट्रपतींचा अपमान करतात. राजघराण्यातील लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, महामहिम द्रौपदी मुर्मू जी 'गरीब' महिला नाहीत, तर एका लहानशा गावातील एका साध्या कुटुंबातून आलेल्या २१ व्या शतकातील बलवान भारताच्या स्वावलंबी महिला आहेत. त्या भारताचा अभिमान आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. या विधानाबद्दल काँग्रेसच्या राजघराण्याने महामहिम राष्ट्रपती आणि संपूर्ण देशाची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे," असे ते म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
दर्जेदार ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य द्यावे ; महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

दर्जेदार ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य द्यावे ; महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणीसह सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्यावे. सेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीतच सेवा द्यावी. तसेच वीजहानी कमी करून वीजबिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (दि. २९) कोकण प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत दिले...

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

१०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ पुन्हा ताकदीने कशी पुढे येईल यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल, असा विश्वास यावेळी भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला...

*भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला

*भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला 'विजय दिवस साजरा करूया!*

आपल्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना 'विजय दिवसाच्या' हार्दिक ' शुभेच्छा! २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून 'भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय' यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवले होते. एवढ्या उंचीवर आणि उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लढले गेलेले हे युद्ध जगातील एकमेव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121