मुंबई : (Bangladesh) बांगलादेशच्या (Bangladesh) चट्टोग्राम जिल्ह्यात धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारा एक धक्कादायक कट उघडकीस आला असून, त्यामुळे या भागातील हिंदू आणि बौद्ध समुदायांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. चट्टोग्राममधील राऊजान उपजिल्ह्यात सापडलेल्या एका पोस्टरमध्ये १३ डिसेंबर रोजी हिंदू आणि बौद्ध समुदायातील जवळपास दोन लाख लोकांना ठार मारण्याचा कट रचल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये सामूहिक हत्यांसाठी निधीही उभारण्यात आल्याचे नमूद असून, हा कट अत्यंत नियोजित आणि संघटित असल्याचे सूचित होते. (Bangladesh)
बांगलादेशी (Bangladesh) सम्मिलित सनातनी जागरण जोटचे प्रतिनिधी कुशल बरुण चक्रवर्ती यांनी सांगितले की, हे पोस्टर सापडल्यानंतर पोलिसांनी ते जप्त केले. पोस्टरमध्ये असे लिहिले होते की, ‘१३ डिसेंबर २०२५ रोजी एक योजना आखली गेली आणि ती अंमलात आणण्यासाठी निधी पुरवण्यात आला. ही योजना आणि निधी चिटगावच्या राऊजान उपजिल्ह्यातील हिंदू आणि बौद्ध समुदायातील एकूण दोन लाख अनुयायांना ठार मारण्यासाठी होती. राऊजानमध्ये हिंदू आणि बौद्ध समुदायाचा कोणताही मागमूस राहू दिला जाणार नाही; त्यांना तिथे राहू दिले जाणार नाही.’ या संदेशात या समुदायांचा पूर्णपणे नायनाट करण्याची धमकी देण्यात आली होती. (Bangladesh)
चक्रवर्ती यांनी बांगलादेशातील (Bangladesh) हिंदूंवरील अलीकडील हत्यांबद्दलही भाष्य केले आणि सांगितले की हिंदूंवरील हल्ले सुरूच आहेत. “प्रथम मयमनसिंगमध्ये दीपु चंद्र दास यांची जमावाकडून हत्या झाली आणि आता आणखी एक हिंदू युवक, अमृत मंडल, याचा खून झाला आहे. सरकार आणि पोलिसांनी त्याला गुन्हेगार म्हटले आहे, पण प्रश्न असा आहे की अटक करण्यात आलेला एक मुस्लिम व्यक्ती जिवंत कसा राहिला, तर मंडल, जो हिंदू होता, तो कसा मारला गेला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Bangladesh)
चक्रवर्ती यांनी सांगितले की पोस्टरमधील भाषा हिंदू आणि बौद्धांना पद्धतशीरपणे लक्ष्य करण्याचा स्पष्ट हेतू दर्शवते. परिसरातील अलीकडील घटना या धोक्याचे गांभीर्य अधोरेखित करतात, असे त्यांनी नमूद केले आणि या प्रकरणाची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. (Bangladesh)
हे पोस्टर त्याच परिसरात आढळले जिथे अलीकडच्या काही दिवसांत अनेक हिंदूंची घरे जाळण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांना जाळपोळीच्या ठिकाणांवर रॉकेल भिजवलेले कापडाचे तुकडेही सापडले. यासोबतच हस्तलिखित चिठ्ठ्या मिळाल्या असून, त्यामध्ये राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक लिहिलेले होते. (Bangladesh)
पोलिसांनी पोस्टर आणि इतर साहित्य जप्त केले असून, दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी आणि या कटामागील व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरातील अल्पसंख्याक समुदायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चौकशी सुरू असताना त्यांनी प्रशासनाकडून कठोर कारवाई आणि संरक्षणाची मागणी केली आहे. (Bangladesh)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक