दिपू चंद्र दासची हत्या करणाऱ्यांना अटक मात्र.....बांगलादेशी लेखिकेचा पोस्टमध्ये खळबळजनक दावा

Total Views |

मुंबई : ( Taslima Nasreen ) बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरूणाची हत्या करण्यात आल्यानंतर, भारतात निर्वासित असलेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी, एक्स माध्यामावर पोस्ट करत बांगलादेशचे अंतरिम मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी पैगंबरांचा अपमान केल्याच्या खोट्या आरोपावरून मारल्या गेलेल्या कोणत्याही हिंदूला आजतागायत न्याय मिळालेला नाही. तसेच बांगलादेशात हिंदूंची हत्या करण्याच्या उद्देशाने अफवा पसरवल्या जातात, असे लिहले आहे.
 
त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे की, मुहम्मद युनुस हा खूप चतुर माणूस आहे. दिपूच्या हत्यारांना अटक केल्याचे आज सांगितले जात आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यातील पुस्तक मेळ्यामध्ये माझे पुस्तक ठेवले म्हणून प्रकाशकावर हल्ला करण्यात आला, त्या हल्लेखोरांना अजूनही अटक नाही. त्यामुळे आज अटक केल्याचा बहाना करून त्यांना उद्या परत सोडण्यात येईल आणि याची बातमी देखील कुठे येणार नाही, याची युनुस काळजी घेईल.

मुहम्मद युनुसने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कठोर दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडले आहे. त्यामुळेच तो जिहादींचा आवडता माणूस आहे. युनुसच्या आदेशावरूनच हिंदू नेते चिन्मय दास कोणत्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात सडत आहेत. जर चिन्मय दास तुरुंगाबाहेर असते तर हिंदूंचे मनोधैर्य वाढले असते. परंतु युनुस तसे होऊ देणार नाहीत हे स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 

 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.