मुंबई : (Lok Bhavan) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ (Lok Bhavan) असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र तथा गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत. (Lok Bhavan)
राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे, असे राज्यपाल यांनी सांगितले. (Lok Bhavan)
‘लोकभवन’ (Lok Bhavan) म्हणून ओळखले जाणारे राजभवन आता केवळ राज्यपालांचे निवासस्थान आणि कार्यालय न राहता राज्यातील नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद आणि सहभाग यांचे एक केंद्र व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
'लोकभवन' (Lok Bhavan) हे सरकार आणि राज्यातील जनतेमध्ये सेवा, सहकार्य व संवादाचा सेतू व्हावे, हीच या नामांतरामागची भूमिका आहे. 'लोकभवन' (Lok Bhavan) केवळ संवैधानिक कर्तव्यांपुरते मर्यादित न राहता, समाजाच्या आशा, आकांक्षा आणि समस्यांप्रति संवेदनशील राहून त्यांच्याशी थेट नाते जपणारे खऱ्या अर्थाने लोकभवन असेल, असेही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी स्पष्ट केले. (Lok Bhavan)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....