विकासासंबंधीचे निर्णय भावनिक नव्हे तार्किक ! : शिवम वाहिया

मुंबईकरांना खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधांच्या उन्नतीचा अनुभव येत आहे

    16-Oct-2025
Total Views |

shivam vahia


मेट्रो लाईन ३ संपूर्ण ३३.५ कि.मी. लांबीची पूर्णपणे भूमिगत कॉरिडॉर अखेर कार्यान्वित झाली. तेव्हा मुंबईला आणि मुंबईकरांना खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधांच्या उन्नतीचा अनुभव येत आहे.


जेव्हा आरे कारशेडवरील वाद सुरू झाला, तेव्हा तो केवळ पायाभूत सुविधांच्या चर्चेपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो भावनिक आणि अस्थिरता वादात परिवर्तित झाला. तेव्हाच मी #CarShedWahiBanega हा हॅशटॅग सुरू केला. हे आंदोलन म्हणून नव्हे तर आठवण म्हणून की, विकासासंबंधीचे निर्णय भावना नव्हे तर तर्कावर आधारित असले पाहिजेत.
आरेविषयीची चर्चा झाडे वाचवण्याबद्दल नव्हतीच तर ती मुंबई कोणत्याही राजकीय नाट्यांशिवाय आणि चुकीच्या माहितीशिवाय एक अत्यावश्यक सार्वजनिक प्रकल्प पूर्ण करू शकते का? याबद्दल होती. काळानुसार तो हॅशटॅग एका प्रतिआंदोलनात रूपांतरित झाला जो घोषणाबाजीऐवजी माहिती, नकाशे आणि तांत्रिक तर्कांवर आधारित होता. त्याने दाखवून दिले की, आरे हे स्थान वैज्ञानिक, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या एकमेव व्यवहार्य पर्याय आहे. ते अन्यत्र हलविणे कधीही शक्य नव्हते. सरकारे बदलली, पण त्यांच्या समित्यांचे निष्कर्ष तेच राहिले.
आता जेव्हा मेट्रो लाईन ३ संपूर्ण ३३.५ कि.मी. लांबीची पूर्णपणे भूमिगत कॉरिडॉर अखेर कार्यान्वित झाली. तेव्हा मुंबईला आणि मुंबईकरांना खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधांच्या उन्नतीचा अनुभव येत आहे. ती कुलाबा ते सिप्झ दरम्यानचा प्रवास एका तासाच्या आत पूर्ण करते आणि शहरातील सर्वात वाईट वाहतूक कोंडीपासून सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय देते आहे.
- शिवम वाहिया
@ShivamVahia