मुंबई : ( Hindu Dharma Sansad Kerala ) केरळमध्ये जुनाट प्रथा आणि रूढींचा नायनाट करून नवीन, प्रगतिशील केरळाची निर्मिती साधणारे मुख्यत्वे संन्यासी आणि समाजसुधारकच होते. त्या परंपरेचा वारसा पुढे चालवत, आज विविध परंपरांतील आदरणीय संन्यासी समाजातील नैतिक अधःपतन रोखण्यासाठी पुढे सरसावले आहेत. हिंदू समाजाला अशा प्रकारे सक्षम करणे आवश्यक आहे की तो संस्कार, संपत्त, संघटन आणि संतान या चार “सकार” च्या वृद्धीद्वारे जगाला मार्गदर्शन करू शकेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आचरण हे तरुण पिढीसाठी आदर्श ठरले पाहिजे. त्यामुळे वडिलधाऱ्यांनी वैयक्तिक तसेच सामाजिक आयुष्यात धर्मनिष्ठ जीवन जगले पाहिजे — हाच संदेश केरळच्या एर्नाकुलम येथे टी.डी.एम. सभागृहात झालेल्या हिंदू नेथ्य संमेलनात संत समाजाने दिला.
मार्गदर्शक मंडळ केरळ येथील आदरणीय संन्यास्यांच्या नेतृत्वाखालील धर्म संदेश यात्रा सकाळी टी.डी.एम. सभागृहात पोहोचली. वैदिक मंत्रोच्चारांनी निनादलेल्या वातावरणात, भक्तसमूहाने पुष्पवर्षाव करून संन्यास्यांचे स्वागत केले. या सभेचे अध्यक्षस्थान पी. शरिधर मेनन, उपाध्यक्ष – एर्नाकुलम स्वगत संघम् यांनी भूषविले. विविध संन्यासी मठांचे प्रतिनिधी आणि साधुसंत उपस्थित राहिले, ज्यामध्ये स्वामी प्रज्ञानानंदतीर्थ पदर, स्वामी चिदानंदपुरी महाराज, स्वामी सत्स्वरूपानंद सरस्वती, स्वामी अय्यप्पदास, स्वामी शारदानंद सरस्वती, स्वामी वेदामृतानंद पुरी, स्वामी अध्यात्मानंद सरस्वती, स्वामी अनघामृतानंद पुरी, स्वामिनी विष्णु प्रियनंदा सरस्वती, स्वामी शिवस्वरूपानंद, स्वामी कृष्णात्मानंद सरस्वती आणि स्वामी प्रभाकरानंद सरस्वती, इ. संत-महंतांचा सहभाग होता.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक