अवैध बांधकामावर स्थानिकांचा हातोडा

समाधी ३०-४० वर्षे जूनी असल्याचा दावा

    28-Jan-2025
Total Views | 115
 
 
 illegal construction
 
 
लखनऊ : उत्तरप्रदेशातील बरेलीमध्ये एका गावात अवैध ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे. बरेली खासदाराने या प्रकरणाची तक्रार केल्यावर प्रशासनाने चौकशी करत नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आता बरेलीच्या खासदारांनी लक्ष घालत अवैध बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.
 
प्रसारमाध्यमाच्या रिपोर्टनुसार, ही घटना बरेलीच्या शाही पोलीस ठाणे हद्दीत गणेशपूरमधील गावात घडली आहे. या गावातील एक जुने थडगे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही समाधी सुमारे ३०-४० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. कट्टरपंथींनी रातोरात त्याच्या भोवती २० फूट उंच खांब उभारले होते.
 
या बांधकामासाठी ना प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती ना कोणतीही माहिती देण्यात आली होती. बरेलीचे खासदार छत्रपाल सिंग गंगावर हे गावानजीकहून जातेवेळी संबंधित प्रकरणाचा खुलासा झाला. त्यांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित प्रकरणाची माहिती मिळवली आहे.
 
या प्रकरणासंबंधित एसडीएमने चौकशीचे आदेश जारी केले. प्रशासनाने तपासणी केली असता हे संबंधित बांधकाम पाडण्यासाठी प्रशासन कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांनी अवैध बांधकामावर हातोडा चालवला आहे. जून्या मंदिराच्या संरक्षणासाठी त्यांनी हे नवे बांधकाम केल्याचे मुस्लिमांनी सांगितले आहे. मात्र, प्रशासनाकडून चौकशी करत याबाबत कोणतेही कागदपत्र दाखवण्यात आलेले नाही.
 
या प्रकरणाची कारवाई करत पोलिसांनी गावातील १०० लोकांविरोधात शांतता भंग केल्याप्रकरणी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांची ५ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. अवैध बांधकाम पाडण्यावर कोणताही एक वाद झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121